विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये TCS मार्फत देण्यात आले तलाठी भरती परीक्षांमध्ये आलेले सामान्य विज्ञान चे प्रश्न आपल्या समोर सादर करत आहोत हे प्रश्न आपल्याला भविष्यातील येणारे तलाठी भरती जिल्हा परिषद भरती नगर परिषद भरती तसेच इतर सरळसेवा परीक्षा यासाठी कामी येतील.
तलाठी भरती 2023 - गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका भाग 1 Talathi Bharti Previous year question paper part 1
1) लीडर हे वृत्तपत्र मुख्यतः खालीलपैकी कोणाच्या धोरणाचे मुखपत्र होते ?
1) सनातनी
2)पुराणमतवादी
3)साम्यवादी
4)उदारमतवादी
उत्तर- लीडर हे वृत्तपत्र मुख्यतः उदारमतवादी धोरणाचे मुखपत्र होते. लीडर हे वृत्तपत्र 1909 मध्ये सुरू झाले खेळत मुख्यतः अलाहाबाद येथून प्रकाशित मध्ये आणि श्री मदन मोहन मालवीय हे या वृत्तपत्रांची संपादक होते
2) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आली आहे ?
1) अनुच्छेद 14
2) अनुच्छेद 15
3) अनुच्छेद 17
4) अनुच्छेद 16
उत्तर - भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 14 अंतर्गत कायद्यापुढे समानता हि संकल्पना मांडण्यात आलेली आहे
3) 1833 च्या चार्टर अॅक्ट बद्दल खालील विधाने विचारात घ्या :
1) बंगालचा गव्हर्नर-जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर जनरल बनला
2) लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता
दिलेला विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे
1) फक्त 1
2)फक्त 2
3) 1 किंवा 2 या पैकी एकही नाही
4) 1 आणि 2 हे दोन्ही
उत्तर- 1 आणि 2 हे दोन्ही
1833 चा चार्टर अॅक्ट - या कायद्यांनी बंगाल चे गवर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवले भारताचा पहिला गव्हर्नर जनरल - विल्यम बेंटिंग होते
याच कायद्याने गव्हर्नर जनरलच्या काऊंसिलमध्ये एक कायदा सदस्याची तरतूद करण्यात आली
4) एप्रिल 2023 मध्ये राणी रामपाल ही स्वतःचे नाव स्टेडियम असलेली,....... मधील पहिली महिला ठरली ?
1) बॅडमिंटन
2) हॉकी
3) मुष्टियुद्ध
4) कुस्ती
उत्तर - हॉकी
राणी रामपाल या भारताच्या महिला हॉकी संघाच्या माजी खेळाडू आहेत त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळविले2010 हॉकी वर्ल्ड कप मध्ये त्यांचा भारतीय संघा मध्ये समावेश होता. राणी रामपाल 2020 मध्ये भारत सरकारने पद्मश्री यांना हा नागरी पुरस्कार दिला
5) खालीलपकी कोणते हे जागतिक तापमानवाढीचे ( ग्लोबल वार्मिंग ) एक कारण नाही ?
1) जंगलतोड
2) वाळूची वादळे
3) जीवाश्म इंधनाचे ज्वलन
4) औद्योगिक उपक्रम
उत्तर - वाळूचे वादळ हे जागतिक तापमानवाढीचे ( ग्लोबल वार्मिंग ) एक कारण नाही
6)2023 मध्ये खालील पैकी कोणत्या राज्याने 45 वर्षा नंतर संतोष ट्रॉफी जिंकली ?
1) पश्चिम बंगाल
2) कर्नाटक
3) महाराष्ट्र
4) ओडिशा
उत्तर - 2023 मध्ये कर्नाटक ने 45 वर्षा नंतर संतोष ट्रॉफी जिंकली
संतोष ट्रॉफी ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे ही स्पर्धा या स्पर्धेची सुरुवात 1941 पासून झाली
7) भारताच्या 2011 च्या जनगणणे नुसार कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वोच्च आहे ?
1) दमन आणि दिव
2) लक्षद्वीप
3) अंदमान आणि निकोबर बेटे
4) दिल्ली
उत्तर - भारताच्या 2011 च्या जनगणणे नुसार दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वोच्च आहे
2011 च्या जनगणनेनुसार केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या घनता पुढील प्रमाणे आहे
दिल्ली - 11320
चंदिगढ - 9258
पुडुचेरी - 2547
दमन व दिव - 2191
लक्षद्वीप - 2149
दादरा नगर हवेली - 700
अंदमान आणि निकोबार - 46
8) प्रशासकीय कार्यक्षमता , पारदर्शकता आणि माहिती ही ......... ची परिणामे आहेत
1) किमान प्रशासन
2) कमाल प्रशासन
3) राजसत्ताक प्रशासन
4) उत्तम प्रशासान
उत्तर - प्रशासकीय कार्यक्षमता , पारदर्शकता आणि माहिती ही उत्तम प्रशासान ची परिणामे आहेत
9) द्वीपकल्पीय पठारातील कोणत्या पर्वतरांगेला/ टेकडीला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते ?
1) सातपुडा पर्वतरांग
2) अरवली पर्वतरांगा
3) निलगिरी टेकड्या
4) नल्लामल्ला टेकड्या
उत्तर - द्वीपकल्पीय पठारातील निलगिरी टेकडीला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते
10) जन माहिती अधिकार्यांना कोणता अर्ज संबोधीत केला जातो ?
1) हिंसाचाराविरुद्ध अर्ज
2) भ्रष्टाचाराविरुद्ध अर्ज
3) आरटीआय अर्ज
4) लाच विरोधात अर्ज
उत्तर - जन माहिती अधिकार्यांना आरटीआय अर्ज संबोधीत केला जातो
11) खालीलपैकी कोणत्या नदीला बंगाल चे दुखाश्रू म्हणून ओळखले जाते
1) सोन
2) तापी
3) गंडक
4) दामोदर
उत्तर - दामोदर नदी
दामोदर नदीचा उगम हा छोटा नागपूर पठारा मधील बाजूमथा जवळ होतो या नदीला जमुनिया, कोनार या उपनद्या आहेत
12) भारतातील अल्पसंख्यांक समुदायांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी ...... मंत्रालयाने हमारी धरोहर योजनातयार केली आहे ?
1) अल्पसंख्यांक व्यवहार
2) संस्कृती
3) शिक्षण
4) पर्यटन
उत्तर - भारतातील अल्पसंख्यांक समुदायांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी .अल्पसंख्यांक व्यवहार या मंत्रालयाने हमारी धरोहर योजना तयार केली आहे
13)खालीलपैकी कोणता अधिनियम कायदा बालविवाह रोखण्याशी संबंधित होते ?
1) मोर्ले - मिंटो
2) सती बंदी कायदा
3)शारदा कायदा
4) विधवा पुनर्विवाह कायदा
उत्तर - शारदा कायदा
14) भारताच्या कोणत्या राज्यांमध्ये दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे ?
1)आसाम
2) बिहार
3) हरियाणा
4) पंजाब
उत्तर - दिफू हे थंड हवेचे ठिकाण आसाम या राज्यात आहे
15) सरल कृषी विमा हे एक अनोखे आणि सर्व समावेशक मापदंड विमा उत्पादन पासून ते प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे शेतकर्यांना होणार्या आर्थिक नुकसानापासून दुहेरीरक्षण करते याअंतर्गत खालीलपैकी कोणता अधिसुचित प्रतियोजीत हवामान मापदंड नाही
1) वारा
2) तापमान
3) सापेक्ष आर्द्रता
4) पाऊस
उत्तर - वारा
अॅग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी ऑफ इंडिया मार्फत सरल कृषि विमा ही राबवली जात आहे
16) खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो की भारत हा राज्यांचा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे ?
1) अनुच्छेद ४
२) अनुच्छेद १
३) अनुच्छेद २
४) अनुच्छेद ३
उत्तर - अनुच्छेद १
अनुच्छेद 1 यामध्ये स्पष्टपणे असे सांगितले आहे की इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल .
17) भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया ...... ह्या तरतुदींनुसार आहेत .
१) नागरिकत्व अधिनियम १९५४
२) नागरिकत्व अधिनियम 1955
3) नागरिकत्व अधिनियम 1953
4) नागरिकत्व अधिनियम 1952
उत्तर - भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया नागरिकत्व अधिनियम 1955 ह्या तरतुदींनुसार आहेत
नागरिकत्व अधिनियम 1955 हा भारतामध्ये नागरिकत्व मिळण्यासंदर्भात केलेला कायदा आहे या कायद्यामध्ये आज पर्यंत 9 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे
नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार नागरिकत्व प्राप्तीचे पुढील पाच मार्ग आहेत
1) जन्म तत्वाद्वारे ( by Birth )
2) वंश तत्वाद्वारे ( By Descent) .
3) नोंदणी तत्वाद्वारे (By registration )
4) स्वीकृती तत्वाद्वारे ( By Naturalisation )
5) प्रदेशाच्या सामिलि करनाद्वारे (By Incorporation of some territory into India )
18) 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषयी काय होता ?
1) स्वास्थ्यासाठी योग
2) आरोग्यासाठी योग - घरात योग
3) शांतीसाठी योग
4) मानवतेसाठी योग
उत्तर - 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषयी हा मानवतेसाठी योग असा होता .
19) कोणत्या राज्यात भारतातील पहिले जैव- ग्राम( Bio Village) स्थापना केले गेले आहे ?
1) त्रिपुरा
2) सिक्किम
3) आसाम
4) मणीपुर
उत्तर - त्रिपुरा या राज्यातील दासपरा या गावात देशातील पहिले जैव ग्राम स्थापन करण्यात आलेल्या
20) खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली ?
1) केंद्रीय दक्षता आयोग
2) केंद्रीय माहिती आयोग
3) केंद्रीय निवडणूक आयोग
4) सीबीआय
उत्तर - 2005 मध्ये केंद्रीय माहिती आयोग स्थापन झाला
21) चुकीच्या रीतीने जोडलेली जोडी ओळखा
A भारत सेवक समाज - गोपाळ गणेश आगरकर
B सोशल सर्व्हीस लीग - गोपाल कृष्ण गोखले
C सत्यशोधक समाज - महात्मा ज्योतिबा फुले
D धर्मसभा - लोकमान्य टिळक
1) A , C आणि D
2) B, D आणि C
3) A , B आणि D
4) A , B आणि D
उत्तर - A , B आणि D
भारत सेवक समाज ची स्थापना श्री गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती
सोशल सर्व्हिस लीग या संघटनेची स्थापना श्री नारायण मल्हार जोशी यांनी केली होती
धर्मसभा या संस्थेची स्थापना श्री राधाकांत देव यांनी केली होती
22) खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही
1) जन्म
2) नैसर्गिकीकरण
3) वंश
4) निवडणूक
उत्तर - भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी निवडणूक ही पद्धत नाही
23) सविनय कायदेभंग चळवळीच्या सन्मानार्थ , ........ यांनी तमिळनाडूमध्ये तंजावर किनारपट्टीवरील त्रिचीनोपोली पासून वेदरण्यम पर्यंत मिठाच्या सत्त्याग्रहाचे नेतृत्व केले ?
1) मदन मोहन मालविय
2) लाला लाजपत राय
3) चक्रवर्ती राजगोपालाचारी
4) जय प्रकाश नारायण
उत्तर - सविनय कायदेभंग चळवळीच्या सन्मानार्थ , चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी तमिळनाडूमध्ये तंजावर किनारपट्टीवरील त्रिचीनोपोली पासून वेदरण्यम पर्यंत मिठाच्या सत्त्याग्रहाचे नेतृत्व केले
24) डिसेंबर 2022 मध्ये ,कोणत्या राज्याने सफाई कामगार विकास योजना सुरू केली ?
1) तमिळनाडू
2) हिमाचल प्रदेश
3) गोवा
4) आंध्रप्रदेश
उत्तर - डिसेंबर 2022 मध्ये , तमिळनाडू या राज्याने सफाई कामगार विकास योजना सुरू केली
25) खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये सांचीचे स्तूप आहे
1) मध्य प्रदेश
2) राजस्थान
3) उत्तर प्रदेश
4) बिहार
उत्तर - सांचीचे स्तूप हे मध्य प्रदेश या राज्यात स्थित आहे.
0 टिप्पण्या