विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये TCS मार्फत देण्यात आले तलाठी भरती परीक्षांमध्ये आलेले सामान्य विज्ञान चे प्रश्न आपल्या समोर सादर करत आहोत हे प्रश्न आपल्याला भविष्यातील येणारे तलाठी भरती जिल्हा परिषद भरती नगर परिषद भरती तसेच इतर सरळसेवा परीक्षा यासाठी कामी येतील.
तलाठी भरती 2023 - गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका भाग 2 Talathi Bharti Previous year question paper part 2
1) भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो , जो स्पष्टपणे दर्शवितो की , भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य विशिष्ट संघराज्य वैशिष्टय़ांसह एकात्मक स्वरूपाचे आहे ?
1) अनुच्छेद 4
2) अनुच्छेद 5
3) अनुच्छेद 3
4) अनुच्छेद 2
उत्तर - भारतीय संविधानातील अनुच्छेद 2 हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो , जो स्पष्टपणे दर्शवितो की , भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य विशिष्ट संघराज्य वैशिष्टय़ांसह एकात्मक स्वरूपाचे आहे
अनुच्छेद 1 - इंडिया इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल
अनुच्छेद 2 -नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे - संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करून घेता येथील किंवा स्थापना करता येतील
अनुच्छेद 3 - नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार - संसदेला कायद्याद्वारे
क ) कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल
ख ) कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल
ग ) कोणत्याही राज्याच्या सीमा मध्ये फेरफार करता येईल
ङ ) कोणत्याही राज्याच्या नावांमध्ये फेरफार करता येईल
अनुच्छेद 4 - पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणी पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व अनुच्छेद 3 अन्वये करण्यात आलेले कायदे.
अनुच्छेद 5 - संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व - या संविधानाचा प्रारंभ , भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि -
क ) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ; किंवा
ख ) जिच्या माता पिता पैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते; किंवा
ग ) जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान पाच वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे
अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल
2) खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही ?
1) अनुच्छेद 15
2) अनुच्छेद 19
3) अनुच्छेद 12
4) अनुच्छेद 2
उत्तर - अनुच्छेद 15 मध्ये अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही
अनुच्छेद 19 - भाषण स्वातंत्र्य , इत्यादींसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण - 1 सर्व नागरिकांस-
क ) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ;
ख ) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ;
ग ) अधीसंघ वा संघ ( किंवा सहकारी संस्था बनविण्याचा ) ;
घ ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ;
ङ ) भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा
छ) कोणताही पेशा आचारण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल
3) माहितीचा अधिकार अधिनियम , 2005 च्या कोणत्या कलमात अधीनियमाच्या अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख आहे
1) कलम 23
2) कलम २२
३) कलम २४
४) कलम २५
उत्तर - कलम २२
४) माहिती स्वातंत्र्य हे विधेयक कधी पारित झाले
1) वर्ष २००३
२) वर्ष २००५
३) वर्ष २००२
४) वर्ष २००१
उत्तर - माहिती स्वातंत्र्य हे विधेयक २००२ मध्ये पारित झाले
५) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१ A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे ?
१) मूलभूत कर्तव्य
२) मूलभूत हक्क
३) नागरिकत्व
४) राज्य धोरणाची निर्देशक तत्वे
उत्तर - मूलभूत कर्तव्य
भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 51 A मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत
क ) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था ,राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे
ख ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे
ग) भारताची सार्वभौमता एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण कर
घ ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे
ङ) धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे ; स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे
च) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ;
छ) वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टि यांसह निसर्ग पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ;
ज) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे ;
झ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;
त्र) राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाचा सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादित करण्यासाठी झटणे ;
ट) मातापिताने किंवा पालकाने ६ ते १४ वर्षादरम्यानचे आपले आपत्ये किंवा यथास्थिती पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे.
6) कोणत्या समाजसुधारकास महाराष्ट्राचा सॉक्रेटीस म्हणून ओळखले जाते ?
1) महादेव गोविंद रानडे
2) आचार्य विनोबा भावे
3) लोकमान्य टिळक
4) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर - महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हटले जाते
महादेव गोविंद रानडे 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली
महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाच्या स्थापने देखील सहभागी होते
न्यायमूर्ती रानडे यांनी इंडियन सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली
न्यायमूर्ती रानडे यांचा इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया चा स्थापनेत महत्वाचा सहभाग होता
7) दुधा मध्ये पुढीलपैकी कोणते प्रोटीन आढळते ?
1)केसिन
2)अल्ब्युमिन
3)ग्वानिन
4) कॅरोटीन
उत्तर - दुधामध्ये केसीन हे प्रोटीन आढळते
8) खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांस लोकहितवादी म्हणून ओळखले जाते ?
1) बाबा आमटे
2) गोपाळकृष्ण गोखले
3) महात्मा ज्योतिबा फुले
4) गोपाळ हरी देशमुख
उत्तर - गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हटले जाते
9) 2011 च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे
1) आसाम
2) बिहार
3) पश्चिम बंगाल
4) सिक्किम
उत्तर - 2011 च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार बिहार या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे
2011 च्या जणांनीचा आकडेवारीनुसार सर्वाधिक घनता असलेली राज्य
1) बिहार - 1106
2) पश्चिम बंगाल - १०२८
3) केरळ - ८६०
४) उत्तर प्रदेश - ८३०
५) हरियाणा - ५७३
१०) भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे ?
१) मिझोराम
२) केरळ
३) अरुणाचल प्रदेश
४) मेघालय
उत्तर - केरळ
११) सत्यार्थप्रकाश ( द लाइट ऑफ ट्रूथ ) हा ग्रंथ ......... यांनी लिहिला
१) गोपाळ गणेश आगरकर
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) स्वामी विवेकानंद
४) स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर - सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला
१२) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना केली
1) सेनापती बापट
2) रमाबाई रानडे
3) महर्षि धोंडो केशव कर्वे
4) गोपाळकृष्ण गोखले
उत्तर - महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना केली
13) कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो
1) दूध
2) शेंगा
3) सफरचंद
4) तांदूळ
उत्तर - शेंगा
14) दिलेल्या पर्यायांपैकी कोणता भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवितो ?
1) उत्तरेकडील मैदानी
2) द्वीपकल्पीय पठार
3) समुद्रतटीय मैदानी
4) हिमालयीन पर्वत
उत्तर - द्वीपकल्पीय पठार
15) भारतीय राज्य घटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या करता येत नाही
1) सामंजस्य वाढविणे
2) मालमत्ता खरेदी करने
3) देशाचे संरक्षण करने
4) सार्वभौमत्वाचे रक्षण करणे
उत्तर - मालमत्ता खरेदी करने
15) भारतीय राज्य घटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या करता येत नाही
1) सामंजस्य वाढविणे
2) मालमत्ता खरेदी करने
3) देशाचे संरक्षण करने
4) सार्वभौमत्वाचे रक्षण करणे
उत्तर - मालमत्ता खरेदी करने
16) पुढीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन लूथर किंग म्हणून ओळखले जाते ?
1) महात्मा ज्योतिबा फुले
2) लोकमान्य टिळक
3)गोपाल कृष्ण गोखले
4)न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
उत्तर - महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचे मार्टिन लूथर किंग म्हणून ओळखले जाते
17) भवानी पाठक आणि देवी चौधराणी खालीलपैकी कोणत्या विद्रोहाशी /बंडाशी संबंधित आहेत
1) भिल्लांचा उठाव
2) कोल विद्रोह
3) संथाळांचा विद्रोह
4) संन्यासी बंड
उत्तर - भवानी पाठक आणि देवी चौधराणी या संन्यासी विद्रोह / बंड शी संबंधित आहेत
18) ...... हे वाईन आणि बियर यासारख्या पेयांतील एक अल्कोहोल आहे ?
1) आयसोप्रोपेनॉल
2) प्रोपेनॉल
3) इथेनॉल
4) मिथेनॉल
उत्तर - इथेनॉल
19) भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली होती ?
1) श्री नरेंद्र मोदी
2) डॉ. मनमोहन सिंग
3) श्री अटलबिहारी वाजपेयी
4) डॉ ए पी जे अब्दुल कलाम
उत्तर - श्री नरेंद्र मोदी
20) माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे ?
1) महाराष्ट्र
2) तमिळनाडू
3) कर्नाटक
4) केरळ
उत्तर - माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य तमिळनाडू हे आहे
21) 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?
1) दादाभाई नौरोजी
2) रासबिहारी बोस
3) गोपाळकृष्ण गोखले
4)मदन मोहन मालवीय
उत्तर - दादाभाई नौरोजी
22) मानवी शरीरात ए जीवनसत्त्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे ?
1) यकृत
2) हाडे
3) मेंदू
4) त्वचा
उत्तर - यकृत
23) खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबधित पहिला दस्तऐवज आहे ?
1) युनायटेड स्टेट्स बिल ऑफ राइट्स 1791
2) बिल ऑफ राइट्स 1689
3) मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा 1949
4) मॅग्ना कार्टा 1215
उत्तर - मॅग्ना कार्टा 1215
24) खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) विष्णूशास्त्री चिपळूणकर
3) रामकृष्ण गोपाळ भांडारकर
4) विष्णूबुवा ब्रह्मचारी
उत्तर - रामकृष्ण गोपाळ भांडारकर
25) खालीलपैकी D जिवणसत्वाचा स्रोत कोणता आहे ?
1) गुजबेरी
2) पालक
3) योगर्ट
4) सूर्यप्रकाश
उत्तर - सूर्यप्रकाश
0 टिप्पण्या